सर
सर सांगुन आली।
घर लांघुन गेली।
मी हसलो एकदा
व्यथा सोडुन गेली।
पाप राहीले तसेच
गंगा वाहुन गेली।
लागली आग उरी
गावे पेटुन गेली
राहीलो जिथल्या तिथे
गर्दी रेटुन गेली।
--- प्रशेन ह क्यावल
माझ्या भुतकाळातल्या तरल मनाची स्पंदनं ह्या गजलच्या स्वरुपात अजून अस्तित्वात आहेत. त्या भावनांना एक ह्क्काचे स्थान देण्यासाठी हा Blog. आशा आहे तुम्हाला जरुर आवडेल. gulkand@yahoo.com
सर सांगुन आली।
घर लांघुन गेली।
मी हसलो एकदा
व्यथा सोडुन गेली।
पाप राहीले तसेच
गंगा वाहुन गेली।
लागली आग उरी
गावे पेटुन गेली
राहीलो जिथल्या तिथे
गर्दी रेटुन गेली।
--- प्रशेन ह क्यावल
पेटलेली वाट जिवघेणी बरी होती।
शेवटचा उसासा रुंद होता।
तिला जीव जाळण्याचा छंद होता।
मदत मागु कुणाची गावात या
इथे हरेक दरवाजा बंद होता।
मी कुणाशी बोलु इथे तत्वज्ञान
जिथे गाव साराच मंद होता।
तु आली होतीस माझ्या चितेवरी
हवेत ओळखीचा तुझा गंध होता।
व्यर्थ गेले प्रयत्न शिकवायचा माणुसकी
प्रत्येकजण तिथे कत्तलीत दंग होता।
स्पर्शातील कशी स्पंदने जाणिवांची तुम्हाला
तुम्ही तेव्हा तुमच्याच मस्तीत धुंद होता।
मारले त्यांनी त्याला देवळात बसवुन
साय्राच गावात तो साय्रांनाच वंद्य होता।
त्यांचा मला मारण्याचा अविर्भाव मुद्दाम आहे।
ही अशी हवा कुंद कुंद।
चाखतो मी पाऊस बुंद बुंद।
पसरली धुक्याची साय दाट
झाली धारा मदिरेत धुंद धुंद।
प्रणय झाय्रांचे जारी जाहले
कर जवळ आता मिठी रुंद रुंद।
जाहली बेफाम बिलगुन लतावेल
प्रणयात निसर्गाच्या गाव सुंद सुंद।
---- प्रशेन क्यावल
बढाई धुरंधरांची खरी होती।
रास निष्पाप मुदर्यांची खरी होती।
तिला जावेच लागणार होते
तिची माझ्याशी यारी खरी होती।
भुलले कोणीच ना त्यांच्या बनावाला
माझी मृत्युवरी दावेदारी खरी होती।
नाही पुरा कुणाचाच जोगवा इथे
अहो, त्यांची लाचारी खरी होती।
कसे बांधतील माझ्या शब्दांना
माझी कोंडलेली प्रतिभा खरी होती।
--- प्रशेन क्यावाल
तुझ्या ओठांची साय ओठी लागली।
मी मलाच आता विसराया लागली।
उधळीत जा माझ्यावरी तू चुंबने
नुकतेच मी गोळा कराया लागली।
फिरु दे बेफाम हात शरीरावरी
मी कुठे जगाची तमा बाळगाया लागली।
मिसळ श्वास तुझा श्वासात माझ्या
धुमसती आग कधीची अता पेटाया लागली।
तुला उगीच वाटते तू मला उपभोगीले
मीच तुझ्या भोगात उमलाया लागले।