जीवनसंचित
कळलेच ना माझे मला,
कोठूनी मी कोठे आलो?
माझ्याच संगतीला,
मी आत कंटाळलो।
देऊ नकोस त्रास मजला
आणखी आता मृत्यो,
मी आताच जीवनाचे,
मढे हे ओढून आलो।
प्रथम जेव्हा लाविला मी
हात लेखणीला,
तेव्हाच आसवांशी,
नाते मी जोडून आलो।
माझ्या भुतकाळातल्या तरल मनाची स्पंदनं ह्या गजलच्या स्वरुपात अजून अस्तित्वात आहेत. त्या भावनांना एक ह्क्काचे स्थान देण्यासाठी हा Blog. आशा आहे तुम्हाला जरुर आवडेल. gulkand@yahoo.com
0 Comments:
Post a Comment
<< Home